top of page

" वाद " नाही, तर " संवाद "

" उद्योजक " आपल्या उद्योगाचा कुटुंबप्रमुखचच असतो. कुटुंब लहान असो वा मोठे - त्याच्या कुटुंबप्रमुखाला कधीतरी "वाद" हे हाताळावेच लागतात. अनेक वेळा , अपेक्षित आणि बऱ्याच वेळा अनपेक्षित ' वाद' तुमच्या पुढ्यात 'दत्त' म्हणून उभे असतात . तुम्हीही असे प्रसंग अनेक वेळा बघितले असतील ना? किंवा त्या प्रसंगातून मार्ग सुद्धा काढला असेल ?


उद्योग धंदा सुरु ठेवण्यासाठी, चालू राहण्यासाठी , रोज अनेक लोकांशी संपर्क येतो . सगळ्याच व्यक्ती आपल्याच सारखा विचार करत असतील असे नाही. कित्येक वेळा , प्रत्येक व्यक्तीची महत्त्वकांक्षा , ही सुद्धा वादाकडे जाण्यासाठी एक विषय होऊ शकतो. अनेक संस्कृती जपणारी माणसं , त्याच्या मनात असणाऱ्या अनेक वेगवेगळा समजुती, शिक्षण आणि अनुभवातील प्रचंड तफावत, अशा अनेक गोष्टी दोन व्यक्तींमधील मतभेद वाढविण्याचे काम करू शकतात.


या सगळ्या गोष्टींचे भान राखत , उद्योजकाला मात्र , हे सर्व मतभेद , जर उद्योगावर , प्रत्यक्ष किंवा अ-प्रत्यक्षपणे परिणाम करत असतील, ते लवकरात लवकर हाताळावे लागतात. अशा वेळी, उद्योगाचा मालक , ही भूमिका , जराशी मागे ठेवून, मित्र म्हणून त्यांच्यामध्ये मिसळून, हे वाद किंवा त्या अनुषंगाने होणारे वाद हा, तिथेच संपवता आले, तर अति उत्तम.

कौशल्य

ही प्रक्रिया प्रत्येक वेळी एवढी सुकर असेल , असे नाही. प्रत्येक वेळी प्रश्न वेगळे असू शकतात आणि त्यामुळेच, प्रत्येक वेळी हे प्रश्न मी हाताळताना , उद्योजकाने , परिस्थिती सुसंगत विचार करून, हे वाद हाताळायला हवेत. वाद हाताळण्याचे कौशल्य हे देखीळ अत्यावश्यक कौशल्य आहे , फक्त उद्योग चालविणाऱ्या व्यक्तीसाठी नाही तर प्रत्येकासाठी ... आजकाल कमी झालेला आणि होत जाणार ' सामुदायिक संयम ' खूप जास्त गरजेचं आहे.


नुकताच अनुभव घातलेल्या ' लॉकडाऊन सकारात्मकता ' सारख्या , अभूतपूर्व परिस्थितीतून , आपण संयम आणि सकारात्मता , या दोन प्रमुख मूल्यांच्या बळावर बाहेर पडू शकलो किंवा अजून उभे आहोत. वाद हाताळण्यासाठी साठी , संयम आणि सकारात्मकता ही दोन्ही मूल्ये, आणि त्याचबरोबर आपल्याला काय हवे आहे ? याचे सजगपणे असलेले भान, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद , योग्यप्रकारे हाताळण्यासाठी आवश्यक आहे.


रोज भेटणाऱ्या अशा वादाच्या प्रसंगांना, जो संवादाची वाट दाखवतो, तोच उद्योजकतेची नवनवीन शिखरे आत्मसात करू शकतो.











bottom of page